सत्कर्माच्या नादात कोणी
कौतुकाची थाप दिली..
नाही पटलं म्हणत कोणी
निराशेची बात केली..
चांगल कार्य म्हणून कोणी
सहकार्याची साथ दिली..
आशेचा भंग झाला म्हणुनी
निराशेने कोणी लाथ दिली..
काही नाती जुळली जरी
विचार कधी जुळत नाही ..
जुळले जरी विचार काही
आदर कधी मिळत नाही..
कुणाच्या मनाला काय वाटतं
याने फरक पडत नाही..
दुसऱ्याच्या आनंदात कधी
कमी कश्याची पडत नाही ..
©गोरक्ष अशोक उंबरकर
निराशा