ही पाखरं वेडी भोळी भाबडी
भराऱ्या घेतात उंच आस्मानी
हरवले हक्काचे घर त्यांचे म्हणून
भिरभिरतात आता दूषित हवामानी !
माणसांनी उध्वस्त केले रान सारे
नि तोडली झाडे हीरवी
भराऱ्या घेण्या जागा नसता ऊरली
म्हणून आता गच्ची नि शहरा शिरली !
शहरातही शिरुन सुरक्षित जागा नाही
न रहायला झाडं न उडायला आकाश
जिकडे पाहावं तिकडे
गगनचुंबी इमारती मात्र खास !
आता त्यांनी तरी काय करावं
या भल्या मोठ्या बुद्धीमान माणसांसमोर
म्हणे अख्ख जगंच माझं
मग तो असो गाव की असो शहर !
माणसाच्या बुद्धिला तर तोडच नाही
पण हा मुर्खपणा पण काही कमी नाही
विज्ञान, भुगोल तर शिकतोयच ना
मग का शिरत नाही पर्यावरणाची काळजी यांच्या डोक्यातही ?
म्हणे प्रगती करतोय,
विकास साधतोय
ऑक्सिजन विकत घेऊन, श्र्वास घेणार ना
तेव्हा कळेल मृत्यूच्या दारात कुणाला ढकलतोय...
- Komal parteki ✍️
©Wings of words
#NatureLove