क्रांतीवीरांनी बलिदान दिले
या भारतभूमीसाठी
'बोलो भारत माता की जय '
हेच वाक्य साऱ्यांच्या ओठी
१५ ऑगस्ट १९४७ रोजी
तिरंगा ठरला भारताची शान
भारत देशाला संविधान सभेत
मिळाला धर्मनिरपेक्षतेचा मान
२०२२ रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली
या अविस्मरणीय क्षणाला
भारत सरकारने नवनव्या योजना आखल्या
उजळून टाकण्या या भारताला
या दिवशी ना पहिली जात, ना पंथ,
ना झाले वाद जातीय
स्वतःचे भान हरपून झाले
एक धर्मनिरपेक्ष भारतीय
वर्षानुवर्षांचा टप्पा पार करता करता
झाला याचा बहारदार उत्सव
अनेक जातींच्या अनेक धर्मांच्या साथीनं रंगला आमच्या
धर्मनिरपेक्ष भारताचा अमृतमहोत्सव
©Shruti Kurane
#i love my India