काल कपाट लावता लावता
काही कागद हातास लागले
आणि त्या कागदावरचे शब्द
पुन्हा मनास लागले... पत्रातून जीव ओतणारे
का इतके निष्ठुर वागलें
तेच-तेच प्रश्न पुन्हा मनास पडू लागले
प्रेम, जिव्हाळा, मैत्री वर नाते होते तरले
मग खूप कमी दिवसात तिचे मन कसे भरले,
तिच्याशिवाय आता अर्धे आयुष्य सरले
तरीही वाटते आयुष्यात
काहीतरी बाकी उरले...
किती आणा किती भाका
सगळे आठवते मागले
पण त्या कागदावरचे शब्द
आज पुन्हा मनास लागले....
काल कपाट लावता लावता
काही कागद हातास लागले
आणि त्या कागदावरचे शब्द
पुन्हा मनास लागले...
...... शब्दछल
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here