तो कित्येक दिवस माझ्याशी, उगाच भांडत होता,
कदाचित माझ्या मिठीत, त्याचा श्वास कोंडत होता...
विचारलेच मग मी त्याला, "तुला जायचे आहे का ?"
मी इथे असताना दुसऱ्या कुणाचे व्हायचे आहे का?
शांत रहात त्याने तिथून, काढता पाय जेव्हा घेतला,
तो आपला नाही आता हा संशय तेव्हा मिटला...
असं कुणाला आपलं मानून थांबवता येत नाही का ?
एकट्यानेच दोघांचं प्रेम देऊन नातं लांबवता येत नाही का ?
कायम आठवत राहीन मी जे काही तो घेऊन गेला,
प्रेम इतकं सोपं नाही हा कायमचा धडा देऊन गेला...
स्वप्नील हुद्दार
.
©Swapnil Huddar
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here