दुःखाच मूळ शोधण्यासाठी
तू तुझा राजमहाल सोडलास,
आणि भटकत राहिलास,
ज्ञानाच्या शोधात.
कधी काट्यातून वाट,
कधी प्रवाही नदीतून वाट.
कधी ऊन कधी पावसाळा,
कधी कडाक्याचा हिवाळा..
"तुझा त्याग,
तुझी ज्ञानउपासना
तुझी जाणून घेण्याची
जिज्ञासा.
तू निघालास ज्या प्रवासात
ते मिळेपर्यंत तू,
वळून सुद्धा पाहिले नाहीस.
तू शिकत राहिलास,
आणि मिळवत गेलास.
ती,
दुःखमुक्तीची वाट.
तू जगाला ते देऊन गेलास,
ते,
ज्ञान तुझ्या
प्रांजळ शिकवणीच.
तू तू होतास जो
कधीच होणे नाही.
आणि तुझ्या आधी कोणी,
झाला ही नाही.
हे केवळ तुलाच जमू
शकत,
सिद्धार्था.
हो सिद्धार्था केवळ तुलाच.
-प्रविणकुमार_वानखेडे.....
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here